पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी*😊

इमेज
*शिक्षकांचे फेव्हरेट विद्यार्थी* 😊 नियमित अभ्यास करणं, कुठेही वेळ पाळणं, हाती आलेलं/घेतलेलं काम जबाबदारीने पार पाडणे, प्रामाणिक असणे, अभ्यास आणि मजा या दोन्हीचा समतोल साधणं, syllabus पेक्षा पुढे किंवा त्याहून अधिक वाचन करणं, अवांतर गोष्टी बघणं, वाचणं, मलाच खूप कळतं याहून समोर असलेल्या माणसाचाही काही अनुभव असतो यावर विश्वास ठेवणं, शिक्षकांप्रती विनम्र भाव असणं, सतत नवीन काहीतरी करून बघण्याची आस, आपलं काम जिद्दीने आणि निष्ठेने पूर्ण करणं, वेळेचं योग्य नियोजन, गरज आणि महत्त्व जाण ून काम करणे साधारण असे गुण असले की विद्यार्थी शिक्षकप्रिय असतात. शाळा कॉलेजात हे असे गुण रुजायला हवेत असा कोणाचाही अट्टहास असण्यात काय हरकत आहे! आता असतं असं की मुलांचे 'करियर ऑप्शन्स' ठरलेले असतात किंवा त्यात त्यांनी आधीच काम करायला सुरुवात केलेली असते. आर्टस् मध्ये असं खूप होतं की मुलं नुसती पदवी असावी हाताशी म्हणून शिकतात. अधिकतर भाषा विषयांसाठी. त्यामुळे त्यांची धारणा अशी असते की कॉलेजला काय (वर उल्लेखलेले) शिस्तीचे गुण पाळायचे वगैरे वगैरे... पण माझं निरीक्षण असं आहे की नुसत्या अभ्यासस...

'इंजिनियर्स डे'च्या निमित्ताने

इमेज
'इंजिनियर्स डे'च्या निमित्ताने असं नाहीय की मी कधीच इंजिनियर्सवर केलेल्या जोक वर हसले नाहीय. मित्रांच्या घरी चाललेली बडबड आणि kt म्हणजे इंजिनियर्सच्या जीवनाचा अविभाज्य भाग समजणाऱ्या लोकांना पाहून अर्थातच हसू येतं. "आजकाल इंजिनियर्स कचऱ्यासारखे पडलेत. त्यांना कोणी भाव देत नाही. इंजिनियरिंग करतात, एवढा पैसा खर्च करतात आणि शिपायांच्या पगाराएवढी नोकरी करतात. इंजिनियरिंगमुळे भारतात बेरोजगारी वाढते." वगैरे वगैरे अनेक गोष्टी तुम्हीही ऐकल्या असतीलच... आणि या सगळ्यापुढे एक निष्कर्ष असा की भारतात शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत. उपयोजित शिक्षण नाहीच. या गोष्टीत मी पूर्णतः सहमत नाही. हे जे वर वाचलंय ते सगळंच्या सगळं लोक कुठल्या विषयाला म्हणत नाहीत! हा प्रश्न मला पडतो. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांना तो विषय शिकून नोकरी नाही म्हणून सरसकट मत बनवू नयेच ना! मी तर एक असा विषय शिकले ज्या विषयाशी नोकरी या शब्दाचा संबंध आहे असं लोकांना स्वप्नात सुद्धा वाटत नाही. मला तर अजूनही आठवतं अर्थशास्त्र सोडून मी जेव्हा 'मराठी वाङ्मय' हा विषय निवडला तेव्हा माझ्या...

बाणगंगा - एक संध्याकाळ

इमेज
रात्र सुंदर, चंद्र सुंदर रात्र काळी होत शाई, मन्मनाच्या कागदांवर हे निघाले तारकांचे संथ तांडे डोंगराशी रात्र थकल्या काफिल्यापरी उतरणीवर चहूदिशांशी हे निघाले दव धुळीचे लोट अन् आले धरेवर रात्र सुंदर, चंद्र सुंदर शांतता ही काय वर्णू, तव मिठीसम आर्त सुंदर चांदण्याने बहकलेल्या रात्रीचे या हर गात्र सुंदर या तुझ्या अनिवार सयीचे जीवघेणे सत्र सुंदर रात्र सुंदर, चंद्र सुंदर रात्र ओला शब्द मागे, या जिण्याचा अर्थ मागे निरवतीच्या अक्षरांवर एक हळवी रेघ उमटे रात्र वेडी, चंद्र वेडा, वेड माझे येई भरावर रात्र सुंदर, चंद्र सुंदर - संदीप खरे फोटो: By आनंदी_अश्विनी @बाणगंगा

पण तू मात्र तसाच राहतोस...

इमेज
गोष्टी बदलतात धूसर होतात नाहीशा होतात या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस पुरोगाम्यांच्या पोस्टी पडतात समर्थकांची उत्तरे येतात लोक इकडून तिकडे जातात या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस बॉम्बेची मुंबई होते एल्फिन्स्टन प्रभादेवी होतं औरंगाबाद बदलायचा विचार होतो या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस लोक नवीन शहरं वसवतात शहरच्या शहरे देशोधडीला लागतात घर म्हणून लोक इमारत बांधतात या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस लोक हसणाऱ्यांवर टीका करतात हसवणाऱ्यांवर टीका करतात रडणाऱ्यांवरही टीका करतात या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस तुला नेहमीच कसं जमतं किनाऱ्यावर राहून तटस्थ जगायला मी याच विचारात असते पण या सगळ्यात तू मात्र तसाच राहतोस विरोध करणाऱ्यांना निदान एक बाजू आहे मी त्याबद्दल बोलताना मलाही एक बाजू आहे माझी नित्य बडबड ऐकतानाही तू मात्र तसाच राहतोस कोणी love करतं कोणी angry होतं कोणी sad तर कोणी haha या सगळ्यात तू मात्र नुसतं like होतोस तुझं तसंच असणं कधी कधी फारच विचित्र वाटतं हे नैराश्याने आलेलं तटस्थपण आहे की तुला खरंच काही मत नाहीय की आणखी काही... ...